- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-ग्रामपंचायत म्हटली की,गावातील नागरिकांचे प्रश्न आलेत.सर्वप्रथम गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.तुम्हाला आम्ही निवडून दिले.त्यामुळे तुम्ही काय करता,याच्याशी आमचे देणे- घेणे नाही.पण किमान गावातील सार्वजनिक हिताची तरी कामे तर करा.जसे की,नालीसफाई,पाणीपुरवठा, स्वच्छता,आरोग्य व इतर सार्वजनिक कामे यांना तर प्राधान्य द्या.समस्यांचे निराकरण न केल्यास कुणाचाही पारा चढणारच.अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील बोर्डा (सूर्ला) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार समस्यांचा पाढा वाचला.पण,कुणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने ‘गावकरी ते राव न करी’ या म्हणी प्रमाणे संतप्त ग्रामस्थांनी ‘हे कायची रोजची भानगड’ म्हणत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास चक्क ग्रामपंचायतीत डांबल्याची घटना उघडकीस आली आहे.
बोर्डा(सूर्ला)ग्रामपंचायतीत काल सोमवारी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती.त्यामुळे गावकरी गावातील समस्या सोडविण्यात याव्यात,यासाठी ग्रामपंचायतीत गेले होते.पण,ऐनवेळी सरपंच,उपसरपंच व इतर पाच सदस्य गैरहजर असल्याने मासिक सभा तहकूब झाली.मासिक सभा तहकूब झाल्याचे ग्रामस्थांना कळताच उपस्थित सर्वांचा पारा चढला.त्यामुळे त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांला विचारणा करून धारेवर धरले.अश्यातच ग्रामसेवकाची बोबडी वळली.संतप्त महिला-पुरुषांनी हे रोजचीच भानगड आहे,असे म्हणत ग्रामपंचायतीच्या आतमध्ये असलेल्या ग्रामसेवकाला कोंबून ग्रामपंचायत कार्यालयाला बाहेरून कुलूप लावले.प्रसंगी उपस्थित ग्राम सदस्यांना सुद्धा गावकऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागले. ग्रामपंचायतीच्या आवारात ग्रामस्थांसह माजी सरपंचा ऐश्वर्या खामनकर,उमेश देशमुख,रवींद्र देसाई,आनंदराव वानखेडे,प्रतिमा कातकर,नंदा हिवरकर उपस्थित होते.
- Advertisement -

