Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू…-देसाईगंज तालुक्यातील आजची घटना…

कोंढाळा येथील इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू…-देसाईगंज तालुक्यातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एका ६४ वर्षीय इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक- २० मे रोजी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे घडली.तुळशीदास शेंडे असे मृताचे नाव आहे.

आज,सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तुळशीदास शेंडे व इतर दोघेजण शेतावर आंबे  तोडण्यासाठी गेले होते.तुळशीदास हे आंबे तोडण्यासाठी झाडावर चढले असता; झाडावरून पाय घसरून पडले.त्यात त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव तसेच शरीरावर जबर मार लागल्याने जखमी झाले.जखमी अवस्थेत त्यांना सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घरी आणण्यात आले.त्यानंतर तुळशीदास यांचे स्वास्थ्य बिघडू लागल्याने त्यांना उपचाराकरिता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर उपचार करतेवेळी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान तुळशीदास शेंडे यांची प्राणज्योत रुग्णालयातच मावळली.तुळशीदास यांच्या पश्चात मुलगा,सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.तुळशीदास शेंडे यांच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!