Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरकिती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी घेतल्याची घटना शनिवार १३ डिसेंबरला दुपारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही शेत शिवारात घडली.वाघाने ४७ वर्षीय शेतकरी महिलेचा जीव घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.छाया अरुण राऊत ४७ वर्षे,रा.गुंजेवाही, ता.सिंदेवाही असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी महिलेचे नाव असून त्या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या.सकाळपासून शेतावर गेलेल्या छाया ह्या सायंकाळ होऊनही घरी परतल्या नसल्याने कुटूंबीय तसेच गावातील नागरिकांनी शेत शिवारात शोध घेतला.पाहतात तो काय छाया यांचा मृतदेह
शेताजवळच रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती सिंदेवाही वनविभाग तसेच पोलिसांना देण्यात आली.वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.घटनेने परिसरात दहशत पसरली असून गावकऱ्यांनी वनविभागाप्रति तीव्र संताप व्यक्त करून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!