Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरकंत्राटी अभियंत्याने घरकुलाचे पैसे काढून देण्यासाठी २० हजार रूपयांची केली मागणी…-तडजोडीअंती १०...

कंत्राटी अभियंत्याने घरकुलाचे पैसे काढून देण्यासाठी २० हजार रूपयांची केली मागणी…-तडजोडीअंती १० हजार रूपये स्विकारले अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील एका घरकुल लाभार्थ्यांकडून घरकुलाची रक्कम देण्यासाठी लाच मागणारा ग्रामिण गृहनिर्माण विभागाचा कंत्राटी कर्मचारी मिलींद मधुकर वाढई याला १० हजार रूपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्याचा मित्र मिस्त्रीकाम करणारा आशिष कुशाब पेंदाम यालाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील रहीवासी असलेल्या तक्रारदारास शबरी आवास योजनेअंतर्गत सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजुर झाले होते.सदर घरकुल बांधाकामाकरीता तकारकर्ता यास चार टप्प्यात बांधकामानुसार रक्कम जमा होणार होती.तक्रारकर्ता यास घरकुल योजनेचे दोन किस्त ६५ हजार रूपये जमा झाले असुन तिसरा टप्पा ४५ हजार व चौथ्या टप्याचे २० हजार असे एकुण ६५ हजार रूपये जमा करून देण्याकरिता मिलींद मधुकर वाढई या कंत्राटी अभियंत्याने २० हजार रूपयाची मागणी केली.तडजोडीअंती १० हजार रूपये स्विकारण्याचे मान्य करून लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्याचा मित्र आशिष कुशाब पेंदाम यांना ताब्यात घेवुन पुढील तपास कार्य सुरु आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!