- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-ऐन साक्षगंधाचा कार्यक्रम होणार,त्याच दिवशी होणारा नवरदेव पहाटेच्या सुमारास गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्याचे लग्न होते.अशातच होणारा नवरदेव गायब कां झाला? अश्या पेचप्रसंग सर्वजण पडले आहेत.राहुल काशीराम राऊत वय २६ वर्षे असे गायब झालेल्या तरुणाचे नाव आहे.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आलेसुर येथे नुकतीच उघडकीस आली आहे.
माहितीनुसार,राहुल राऊत याचे आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास विवाह सोहळा पार पडणार होता.तत्पूर्वी सोमवारी २८ एप्रिलला दुपारच्या सुमारास त्याचा साक्षगंधाचा कार्यक्रम होणार होता व काल,मंगळवारी २९ एप्रिलला मंडप पूजन होते.अशातच राहुल हा २८ एप्रिलच्या पहाटे कुणालाही काहीही न सांगता घरून निघून गेला.कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी इतरत्र शोध घेतला.मात्र,त्याचा थांगपत्ताच लागलेला नाही.त्यामुळे कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून मिसिंगची तक्रार दाखल केली.कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलीस प्रशासन राहुलच्या शोधात आहेत.
- Advertisement -

