- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपुरातील शिक्षण विभागात बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असतांना धक्कादायक बाब समोर आली आहे.काही खासगी शाळांमध्ये संस्थाचालकांच्या पत्नी,मुलगा,सून व इतर नातेवाइकांची शिक्षक व कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे, यापैकी अनेकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता नसतांनाही त्यांना शालार्थ आयडी कसे देण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात हा प्रकार सुरू आहे.
अशा शाळा वजनदार लोकांच्या असल्याने आजवर त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही.शालार्थ आयडी घोटाळ्याच्या निमित्ताने आता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र कर्मचारी (सेवाशर्ती) नियम,१९८१ नुसार खाजगी शाळांमध्ये पात्र शिक्षकांचीच नियुक्ती करणे बंधनकारक आहे.त्यासाठी डीएड,बीएड किंवा संबंधित विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
मात्र,अनेक प्रकरणांमध्ये या नियमांची पायमल्ली करून नातेवाइकांची भरती करण्यात आली आहे.हे सर्वकाही उघड्या डोळ्यांनी घडत असतांना शिक्षण खात्याने मंजुरी कशी दिली?असा केविलवाणा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
- Advertisement -

