Tuesday, July 28, 2026
Homeनागपूरशैक्षणिक पात्रता नसतांनाही शाळांमध्ये संस्थाचालकांच्या घरचीच टीम..!

शैक्षणिक पात्रता नसतांनाही शाळांमध्ये संस्थाचालकांच्या घरचीच टीम..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरातील शिक्षण विभागात बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असतांना धक्कादायक बाब समोर आली आहे.काही खासगी शाळांमध्ये संस्थाचालकांच्या पत्नी,मुलगा,सून व इतर नातेवाइकांची शिक्षक व कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे, यापैकी अनेकांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता नसतांनाही त्यांना शालार्थ आयडी कसे देण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मागील अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात हा प्रकार सुरू आहे.
अशा शाळा वजनदार लोकांच्या असल्याने आजवर त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली नाही.शालार्थ आयडी घोटाळ्याच्या निमित्ताने आता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र कर्मचारी (सेवाशर्ती) नियम,१९८१ नुसार खाजगी शाळांमध्ये पात्र शिक्षकांचीच नियुक्ती करणे बंधनकारक आहे.त्यासाठी डीएड,बीएड किंवा संबंधित विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
मात्र,अनेक प्रकरणांमध्ये या नियमांची पायमल्ली करून नातेवाइकांची भरती करण्यात आली आहे.हे सर्वकाही उघड्या डोळ्यांनी घडत असतांना शिक्षण खात्याने मंजुरी कशी दिली?असा केविलवाणा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!