Thursday, August 6, 2026
Homeनवी दिल्लीउमेदवारांचे भवितव्य २० मे ला ईव्हीएम मशीनमध्ये होणार बंद…-लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा;...

उमेदवारांचे भवितव्य २० मे ला ईव्हीएम मशीनमध्ये होणार बंद…-लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; ४९ मतदारसंघात होणार मतदान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी धडधडत असलेल्या प्रचारतोफा आज,दिनांक-१८ मे रोजी सायंकाळी थंडावल्या.देशभरातील ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील एकूण ४९ मतदारसंघांमध्ये सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे.या मतदानातून काँग्रेस नेते राहुल गांधी,केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल,स्मृती इराणी, कपिल पाटील,भारती पवार यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला नशीब आजमावत आहेत.

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांसह उत्तर प्रदेश १४, बिहार ५, पश्चिम बंगाल ७, झारखंड ३, ओडिशा ५, जम्मू आणि काश्मीर १, लडाख १ अशा एकूण ४९ मतदारसंघात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मुंबईतील उत्तर, उत्तर-पश्चिम, उत्तर-पूर्व, उत्तर-मध्य, दक्षिण-मध्य आणि दक्षिण ९ मुंबई मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक, भिवंडी या १३ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे.या सर्वच ठिकाणी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अपक्षांनी प्रचारात चांगलाच जोर लावल्याचे बघायला मिळाले आहे.

मुंबईत महायुती आणि महाविकास आघाडीने शुक्रवारी जाहीर सभांचा धडाका लावून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संयुक्त सभा घेतली.

महाविकास आघाडीने घेतलेल्या जाहीर सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहभाग घेऊन वातावरण तापविले.प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी रोड शो,कॉर्नर सभा आणि रॅलींचे आयोजन करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

उत्तरप्रदेशातील रायबरेलीत राहुल गांधी यांचा सामना भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्याशी आहे.अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांची लढत काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांच्याशी आहे.लखनौमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यापुढे सपाचे रविदास मेहरोत्रा यांचे आव्हान आहे.

कैसरगंजमध्ये वादग्रस्त खासदार ब्रूजभूषण सिंह यांचे पुत्र करणभूषण सिंह मैदानात आहेत.त्यांची लढत सपाचे राम भगत मिश्रा आणि बसपाचे नरेंद्र पांडे यांच्याशी आहे.बिहारच्या सारण मतदारसंघात राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य नशीब आजमावत आहेत.त्यांची लढत भाजप नेते राजीव प्रताप रूडी यांच्याशी आहे.

महाराष्ट्रात ९ मुंबई उत्तरमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची टक्कर काँग्रेसचे भूषण पाटील यांच्याशी आहे. ९ मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यापुढे भाजपचे उज्वल निकम यांचे आव्हान आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांची लढत पीडीपीचे फैयाज अहमद मीर यांच्याशी आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार 👇

काँग्रेस नेते राहुल गांधी- रायबरेली (उत्तर प्रदेश)

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह- लखनऊ (उत्तर प्रदेश)

केंद्रीय मंत्री पियुष गोयल- मुंबई उत्तर (महाराष्ट्र)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी- अमेठी (उत्तर प्रदेश)

नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला- बारामुल्ला (जम्मू आणि काश्मीर)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!