Friday, May 1, 2026
Homeचंद्रपूरउत्पादन शुल्क अधीक्षकासह तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…-चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे पदाधिकारी

उत्पादन शुल्क अधीक्षकासह तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…-चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे पदाधिकारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ या तिघांना १ लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल,मंगळवारी रंगेहाथ पकडून अटक केली आहे.

नवीन बिअर दुकानाच्या परवान्यासाठी त्यांनी १ लाख ३० हजारांची मागणी केली होती.घुग्गुस येथे गोदावरी बार अँड रेस्टॉरंट आहे.त्या मालकाने नोव्हेंबर २०२३ मध्ये नवीन बिअर शॉपीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता.मात्र त्या वेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी नाहक त्रास देत टाळाटाळ केली.काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी,मी तुमचा बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देतो,

मात्र त्यासाठी अधीक्षक व स्वतःसाठी १ लाख रुपयांची मागणी केली.दरम्यान २५ एप्रिलला तक्रारकर्त्याने चंद्रपूर एसीबीत तक्रार दिली.उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर कार्यालयात ७ मे रोजी कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून १ लाखाची रक्कम स्वीकारली. त्यानंतर खारोडेंनी पैसे मिळाल्याबाबत अधीक्षक पाटील यांना मोबाइलद्वारे सूचना दिली.यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री पटवत,१ लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अधीक्षक संजय पाटील,अभय खताळ व चेतन खारोडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नरेश नन्नावरे,हिवराज नेवारे,संदेश वाघमारे,राकेश जांभुळकर,प्रदीप ताडाम,पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केली.अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात ४०० नव्या बिअरबारला परवाने : वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती.६ वर्षानंतर म्हणजेच २०२१ ला महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्याची दारूबंदी हटवली.दारूबंदी हटल्यानंतर चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य दारू दुकानासाठी परवाने दिले.ज्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली,त्यावेळी एकूण ३५० बिअरबार होते.वर्ष २०२१ मध्ये दारूबंदी उठवल्यावर जिल्ह्यात तब्बल ७५० बिअरबार अस्तित्वात आले.अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात ४०० नव्या बिअर बारला परवाने देण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!