- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ करणाऱ्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत आणून सोडले आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.त्यातच अवकाळी पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील शेतकरी वर्गावर मोठे संकट ओढवले आहे.ऐन धान कापणीच्या तोंडावर अवकाळी पावसाने शेतातील उभे पीक व काढणीस आलेले धान भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान करून सोडले.या पार्श्वभूमीवर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आज,शनिवार १ नोव्हेंबर रोजी कुरखेडा तालुक्याच्या येंगलखेडा गावनजिक परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रसंगी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान,धानाच्या कडपा कुजल्याने झालेले आर्थिक नुकसान तसेच सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली.यावेळी आमदार रामदास मसराम यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात-लवकर आर्थिक मदत देण्याच्या सूचना केल्या व केवळ येंगलखेडाच नाही तर संपूर्ण आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांमध्ये ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे; त्या सर्व ठिकाणी त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी; यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

प्रसंगी नुकसानग्रस्त शेतबांधावर आमदार मसराम यांचेसह माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कुरखेडा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी,विलास बन्सोड, कमलेश बारस्कर,इंदूरकर,सरपंच सदानंद हलामी, संतोष पुराम,विजय साखरे,अंबरशाह पारसे,दामोधर वट्टी, नीलकंठ कोकोडे,आसाराम हलामी,तुकाराम मारगाये, बाळकृष्ण पुराम,मंजुळा मारगाये,विश्वनाथ चन्ने,किशोर राणे,लालाजी वट्टी,राजकुमार बावनथडे, राजेश आलाम, सुधाकर किरणापुरे,अशोक लोणारे,स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तथा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

