Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजआदिवासी बांधवांनी हक्क संरक्षणासाठी संघटित होऊन लढा उभारणे आवश्यक... -रामदास मसराम यांचे...

आदिवासी बांधवांनी हक्क संरक्षणासाठी संघटित होऊन लढा उभारणे आवश्यक… -रामदास मसराम यांचे प्रतिपादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली) :-देशातील मुलनिवासी असलेल्या आदिवासी समाजावर शासन व्यवस्थेच्या माध्यमातुन व काही अराजक तत्वांच्या माध्यमातुन सातत्याने अन्याय केला जातो आहे.भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातुन या समाजाची उन्नती व्हावी; यासाठी बहाल केलेल्या अधिकारांना संपुष्टात आणण्याचे कट कारस्थान राज्यव्यवस्था व न्याय व्यवस्थेच्या माध्यमातुन केले जात आहे.आपले हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आदिवासी समाजाने संघटित होऊन समाजहित संरक्षणाचा लढा उभारला पाहिजे; असे प्रतिपादन आदिवासी तथा काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमा प्रसंगी केले.            ९ आगस्ट जागतिक मुल निवासी व आदिवासी दिनाचे औचित्य साधुन देसाईगंच्या क्रांतीसुर्य बिरसामुंडा समितिच्या वतिने फव्वारा चौकात जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.तुकुम वार्डातुन परंपरागत आदिवासी रेला नृत्य सादर करीत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने  कार्यक्रम स्थळी उपस्थित झाले. कार्यक्रमाला संबोधीत करतांना आदिवासी तथा काँग्रेस नेते रामदास मसराम म्हणाले की,या देशात आदिवासी समाजावर प्रस्थापित व्यवस्थेच्या माध्यमातुन सातत्याने अन्याय केला जात आहे. मणिपूर मध्ये आदिवासी समाजबांधवांच्या कत्तली केल्या जात आहेत; महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहे.मात्र,या देशातील शासन व्यवस्था याकडे अजिबात लक्ष देत नाही.कोणत्याही समाजाच्या घटनादत्त आरक्षणावर निर्णय घेण्याचे अधिकार केवळ या देशाच्या संसदेलाच असतांना आठवडाभरा पुर्वी सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक मार्गाने निर्णय देत,या देशातिल एससी व एसटी समुदायाला ऱाज्यघटनेने बहाल केलेल्या आरक्षणावर क्रिमिलेयर ची अट लावली.खरे पाहता या समाजांना उन्नतीच्या शिखरावर पोहचण्यासाठी अजुनही संधी उपलब्ध झालेली नाही.आजही हा समाज दारिद्र्याचे जिवन जगतो आहे.या देशातिल नैसर्गीक साधन संपत्तीचे रक्षण करण्याचे काम अतिदुर्गम भागातिल आदिवासी समाज करत आहे.अजुनही या समाजाला आरोग्य सुविधा,शैक्षणिक सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.नैसर्गीक साधन संपत्तीचे रक्षण करणाऱ्या आदिवासी बांधवांची गोड्या झाडुन हत्या केली जाते.पण कुणीही आवाज उठवीत नाहीत.आज परिस्थिती अनुकुल नसतांनाही आदिवासी विद्यार्थी अतिशय मेहनत घेऊन स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन स्व:ताला सिद्ध करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करीत आहेत.आदिवासी समाजात विविध जातिंचा समावेश करुन या समाजाच्या अधिकाराची फाळणी करण्याचे कट कारस्थान या देशाच्या शासन व्यवस्थेकडुन केले जात आहे.ही बाब या समाजाच्या आर्थीक शैक्षणिक व राजकिय उन्नतिला मारक असुन त्यात क्रिमिलेयरची अट लावणे म्हणजे भारतीय राज्यघटनेने या समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाच्या माध्यमातुन  दिलेल्या अधिकारांची हत्या करणे होय.हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आदिवासी समाजाने संघटित होऊन लढा उभारला पाहिजे; असे परखड मत रामदास मसराम यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला कसारीचे माजी सरपंच राघोजी कुमरे, ॲड.राजेंद्र मरसकोल्हे,शशिकांत मडावी,माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी,पं.स.समितीचे माजी सभापती परसराम टिकले,जि.प.माजी सभापती नाना नाकाडे,माजी उपसभापती नितिन राऊत,विजय बन्सोड,डॉ.आशिष कोरेटी,गणेश काटेंगे,इनवते यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमप्रसंगी प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल उईके, अमित केरामी,डॉ.विजय उईके,विजय भलावी,उमेश उईके,खुशाल उईके,सुखदेव जुमनाके,मारोती जुमनाके यांचेसह क्रांतिसुर्य बिरसामुंडा समितिच्या सदस्यांनी अविरत प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बंडु सिडाम तर आभार प्रदर्शन मिलिंद उईके यांनी केले. कार्यक्रमाला देसाईगंज शहरातील बहुसंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!