- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करणे हे काही रेती तस्करांचे फॅशन झाले आहे.सतत रेतीची चोरी करणाऱ्यांना मुभा दिली जाते.तर एखादेवेळी ‘चला एक ट्रीप रेती आणूनच पाहू’ म्हणणाऱ्यांना कारवाईच्या कचाट्यात पकडल्या जाते.ही वास्तविकता आहे. अश्यातच चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात अवैध रेती वाहतूक प्रकरणी एक धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.एका ट्रॅक्टर मालकाचा महसूल विभागाने अवैध रेतीचा ट्रॅक्टर पकडला.ट्रॅक्टर पकडताच आता लाख रुपये कुठून भरावे,या विवंचनेत सापडून त्याच्या मनात कारवाईची धास्ती निर्माण झाली. कारवाईच्या धास्तीने चक्क ट्रॅक्टर मालकाने जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा बेत आखला आणि चक्क विहिरीतच उडी मारली. मात्र,महसूल पथकातील अधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी तात्काळ आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी धाव घेत त्याला विहिरीतून बाहेर काढल्याने ट्रॅक्टर मालक मरता-मरता वाचला असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी वरोरा तालुक्याच्या वडगाव गावाजवळ घडली.प्रणय गारघाटे असे विहिरीत उडी मारलेल्या ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे.
घटनेच्या दिवशी महसूल विभागाला अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, बामर्डा-वडगाव रस्त्यावर एक विनापरवाना ट्रॅक्टर अडवले. वाहतूक पास तपासणी केली असता ट्रॅक्टरमालक आणि चालकाकडे कागदपत्रे आढळून न आल्याने कारवाई सुरू करण्यात आली.दरम्यान, भीतीने प्रणय गारघाटे याने जवळ असलेल्या विहिरीत उडी घेतली.वेळीच गावकऱ्यांनी धाव घेतल्याने गारघाटे याचे प्राण वाचविण्यात यश आले.मात्र,कारवाईच्या धास्तीने जीव गेला असता तर यांस जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासनास अवैध रेती चोरी प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्या जात आहे,तर काही रेती चोर नवनवीन फंडे वापरून पळवाटा शोधू लागलेत.
- Advertisement -

