Friday, August 7, 2026
Homeनवी दिल्लीअरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा; 'या' होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री..

अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा; ‘या’ होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा रंगली होती.आता या चर्चांवर पूर्णविराम लागला असून आतिशी मार्लेना या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत.अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. याला पक्षातील आमदारांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील.आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील.यापूर्वी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्यानंतर आता आतिशी यांना हा मान मिळणार आहे.याआधी आम आदमी पक्षाच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटीचया (पीएसी) नेत्यांनी दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचे नाव सुचवले होते. काल,सोमवारी १६ सप्टेंबरला पीएसीची बैठक झाली होती.या बैठकीत आतिशी यांचे नाव सुचवले होते.अरविंद केजरीवाल यांनी रविवारी १५ सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.यानंतर सायंकाळी साडेचार वाजता अरविंद केजरीवाल आणि भावी मुख्यमंत्री आतिशी आणि अन्य कॅबिनेट मंत्री नायब राज्यपाल विनीत सक्सेना यांच्या कार्यालयात पोहचले.सायंकाळी ४.४५ वाजता दिल्लीचे नायब राज्यापल विनय सक्सेना यांच्याकडे केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. आता दिल्ली सरकारने २६ आणि २७ सप्टेंबरला विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे.अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. यानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती.सीबीआयच्या खटल्यात त्यांना १३ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता.तर, ईडीच्या खटल्यात त्यांना आधीच जामीन मिळाला होता.त्यामुळे ते १३ सप्टेंबरला तिहार तुरुंगातून बाहेर आले.यानंतर रविवारी १५ सप्टेंबरला आप कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.मला अग्निपरीक्षा द्यायची आहे.जोपर्यंत जनता मला माझ्या प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देत नाहीत; तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही; असे केजरीवाल म्हणाले होते.

कोण आहेत आतिशी मार्लेना👇

आतिशी मार्लेना यांचा जन्म ८ जून १९८१ रोजी दिल्लीत झाला.त्यांचे वडील नामविजय सिंह हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत.आतिशी यांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल स्कूल नवी दिल्ली येथे झाले.त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून चेव्हनिंग स्कॉलरशिपवर पदव्युत्तर पदवी मिळवली.काही वर्षांनी त्यांनी ऑक्सफर्डमधून शैक्षणिक संशोधनात रोड्स स्कॉलर म्हणून दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली.त्यांनी मध्य प्रदेशातील एका गावात सात वर्षे सेंद्रिय शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालींमध्ये अभ्यास केला.तिथे अनेक संस्थांसोबत त्यांनी काम केले आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.तिथेच त्या प्रथम काही आप पक्षाच्या सदस्यांना भेटल्या होत्या.२०२० मध्ये आतिशी पहिल्यांदाच कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या.त्यांनी भाजपचे उमेदवार धरमवीर सिंह यांचा ११ हजार ३९३ मतांनी पराभव केला.२०२३ मध्ये पहिल्यांदा त्यांना केजरीवाल सरकारमध्ये मंत्री पदाची संधी मिळाली.अवघ्या एका वर्षानंतर २०२४ मध्ये त्या मुख्यमंत्री होणार आहेत.यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये पूर्व लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती. भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्याकडून ४.७७ लाख मतांनी त्या पराभूत झाल्या होत्या.आतिशी या केजरीवाल यांच्या जवळच्या सहकारी आणि विश्वासू मानल्या जातात.अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळापासून त्या संघटनेत सक्रिय आहेत.सध्या त्यांच्याकडे बहुतांश मंत्रालयांची जबाबदारी आहे.मार्चमध्ये केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून त्या पक्षापासून ते सरकारपर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर पुढाकार घेताना दिसत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!