गोंदिया :-पूर्वी अनेकजण नाभिकांकडे न जाता घरच्या घरीच दाढी आणि केसांची कटिंग करायचे; काळानुरूप हळूहळू बदल होत गेला आणि लोकं नाभिकांकडे जाऊन दाढी आणि कटिंग करू लागले.आता अनेकांना नाभिकांची सवय जडलेली दिसून येत आहे.अशातच नाभिक बांधवांनी दाढी आणि कटिंगला हातच लावला नाही तर काय होणार?असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आला आहे.तब्बल ३ हजार नाभिकांनी दाढी आणि कटिंगला हात न लावता एक दिवसीय ‘हजामतबंदी’ घातली.
अन् ३ हजार नाभिकांनी दाढी,कटिंगला हात न लावता केली ‘हजामतबंदी’…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नाभिक समाज हा अल्पसंख्यांक असून; आर्थिक दृष्ट्या मागास आहे.सर्वांना स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी केश कर्तनालयाचा व्यवसाय करतो. तरीपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर न केल्यामुळे अखेर ३० सप्टेंबरला गोंदिया जिल्ह्यातील सुमारे ३ हजार सलून दुकाने बंद ठेवण्यात आले.अनेक वर्षांपासून जवळपास सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळींना नाभिक समाजाच्या मागण्यांचे अनेक निवेदने दिली आहेत.यात नाभिक समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास असून,सर्वांना स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी केश कर्तनालयाचा व्यवसाय करीत आहे.त्यामुळे अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासाठी तसेच व्यवसायात भरपूर वाढ होण्यासाठी संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करुन,दोनशे कोटींची आर्थिक रुपात तरतूद करणे; अशा विविध मागण्यांचे अनेक निवेदने देण्यात आले आहेत.परंतू,आजपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारकडून मागण्या मंजूर करण्यात आल्या नाहीत.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

