- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-तब्बल ४० पेक्षा अधिकचे प्रवासी घेऊन गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे निघालेल्या एका इलेक्ट्रिक बसला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना आज,शुक्रवार ८ मे रोजी दुपारच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील घंटाचौकीजवळ घडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.सुदैवाने जीवितहानी टळली.मात्र, उन्हाच्या तीव्र झळांमुळे बसने काही क्षणांतच पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली.एमएच ४९ बीझेड ४१८७ क्रमांकाची इलेक्ट्रिक बस चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल बसस्थानकावरून प्रवाशांना घेऊन पुढे रवाना झाली होती.बस भरधाव वेगात असतांना बसमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना बाहेर निघण्यास सांगितले.दरम्यान,बसने काही क्षणांतच पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे अधिकारी,पोलिस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला,मात्र तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती.

- Advertisement -

