Friday, May 8, 2026
Homeचंद्रपूरअन् धावत्या बसने क्षणांतच घेतला पेट; जीवितहानी टळली..

अन् धावत्या बसने क्षणांतच घेतला पेट; जीवितहानी टळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-तब्बल ४० पेक्षा अधिकचे प्रवासी घेऊन गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे निघालेल्या एका इलेक्ट्रिक बसला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना आज,शुक्रवार ८ मे रोजी दुपारच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील घंटाचौकीजवळ घडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.सुदैवाने जीवितहानी टळली.मात्र, उन्हाच्या तीव्र झळांमुळे बसने काही क्षणांतच पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली.एमएच ४९ बीझेड ४१८७ क्रमांकाची इलेक्ट्रिक बस चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल बसस्थानकावरून प्रवाशांना घेऊन पुढे रवाना झाली होती.बस भरधाव वेगात असतांना बसमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व प्रवाशांना बाहेर निघण्यास सांगितले.दरम्यान,बसने काही क्षणांतच पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे  अधिकारी,पोलिस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला,मात्र तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या सोमवारपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया.. – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची सुविधा येत्या,सोमवार ११ मे...

नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सीआरपीएफ कॅम्पसाठी २ हेक्टर जमीन.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील...

पोलिसांना न्यायालयात बिनशर्त मागावी लागली माफी.. – महिलेच्या घरात प्रवेश केल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पोलिसांना सर्वकाही माहित असतांनाही काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अंगात 'पोलीसगिरी' चा रोप झाडतांना दिसून येतात.मात्र,यांस काहीजण अपवादही आहेत.पोलीस खाते हे...

दहावीचा निकाल जाहीर; निकालात दोन टक्क्यांची घसरण..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच शनिवार,२ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता.बारावीत महाराष्ट्र राज्याचा ८९.७९ टक्के एकूण निकाल  लागला होता.यात मुलींनीच बाजी मारून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!