- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील नेरी (पाचगाव) येथे अडीच महिन्यांपूर्वी नव्यानेच तलाठी म्हणून रुजू झालेल्या २८ वर्षीय अजय पांडुरंग परचाके यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना काल,रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भंडारा वरठी मार्गावरील गणेशनगरी जवळ दाभा येथे घडली.अजय परचाके हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी होते.मोहाडी तहसील कार्यालयात तलाठी म्हणून ६ फेब्रुवारी २०२५ रोजी रुजू झाले होते.रेतीचा जप्त केलेला साठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी नेरी येथील तलाठी अजय परचाके हे खमारी बुज.येथे गेले होते.त्यानंतर अजय परचाके हे खमारी येथून नेरीचे कोतवाल रमेश मेश्राम यांच्यासोबत दुचाकी क्रमांक-एएच ४० एबी-८४२० ने परतीच्या मार्गावर असतांना गणेशनगरी दाभा येथे मागून येणाऱ्या रोहित शंकर भुरे वय २१ वर्षे, रा.टाकळी,भंडारा याने एमएच ३६ एपी ५११७ क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली.यात परचाके हे खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यातच दुसऱ्या दुचाकीस्वारालाही दुखापत झाली.दोघानांही तात्काळ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. अशातच तपासणीअंती तलाठी परचाके यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.तसेच दुसऱ्या चालकावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
- Advertisement -

