Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजअखेर 'त्या' अनोळखी व्यक्तीची ओळख पटली... - देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारात गळफास...

अखेर ‘त्या’ अनोळखी व्यक्तीची ओळख पटली… – देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारात गळफास घेऊन केली होती आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळ एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल,शनिवारी १९ ऑक्टोंबरच्या दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने परिसरातील शेतकरी शेत बांधावर गेले होते.अशातच काही शेतकऱ्यांना एक अज्ञात इसम शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.काहींनी जवळ जाऊन बघितले असता,अनोळखी इसमाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली असल्याचे लक्षात आले.लगेच नागरिकांनी याबाबत देसाईगंज पोलीस ठाण्याला माहिती दिली.देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.रात्री पर्यंत इसमाची ओळख पटलेली नसल्याने देसाईगंज पोलिसांपुढे मोठे आवाहन होते. त्यानुसार ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक माने,बिट अंमलदार मदन मडावी व सहकारी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अखेर आज,रविवारी २० ऑक्टोंबरला अनोळखी इसमाची ओळख पटली.
विकास अशोक गुरूनुले वय २८ वर्षे रा.सरडपार, ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.विकास हा आरमोरी तालुक्याच्या रामाळा येथील सासुरवाडीला आला होता.त्याची पत्नी बाहेरगावी कामाला गेली होती. अशातच त्याने काल,शनिवारी १९ सप्टेंबरच्या दुपारी गळफास कां घेतला? हे अद्यापही गुलदस्त्यात असून पुढील तपास कुरुड-कोंढाळा बिट अंमलदार मदन मडावी हे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!