- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शहराच्या रामनगर पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या अष्ठभुजा वॉर्डात सोमवारी ४ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मारहाण करून तरुणाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार रामनगर पोलिस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता मारहाण करणारे आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळताच तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या दोन तासात चार आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.२६ वर्षीय सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्राम,३० वर्षीय टिल्लू उर्फ अनिल रामाजी निकोडे,३० वर्षीय सुलतान अली साबीर अली,३८ वर्षीय बबलु मुनीर सय्यद सर्व रा.अष्टभुजा वॉर्ड,चंद्रपूर अशी आरोपींची नावे असून आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.चौघांनीही ३५ वर्षीय छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ रा.अष्टभुजा वॉर्ड या तरुणाची लाठीकाठीने मारहाण करून हत्या केली होती.सदरची हत्या ही प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.अश्यातच आता पोलिस तपासात एका मुलीसाठी हत्या केल्याचे उघड झाले आहे.आरोपी सुमोहित उर्फ गोलू याची मैत्रीण होती.त्या मैत्रिणीशी मृणाल हेडाऊ हा जवळीकता वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब सुमोहित व त्याच्या मित्रांना कळाली.त्यामुळे चौघांनीही त्यास बेदम मारहाण केली.मारहाणीत मृणाल हेडाऊ याचा मृत्यू झाला.प्रकरणी चौघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.विशेष म्हणजे,मयत मृणाल हा विवाहित होता.त्याची पत्नी त्याच्याजवळ राहत नसल्याने तो घरी एकटाच राहायचा.क्षुल्लकशा कारणासाठी त्याला जीव गमवावा लागला.
- Advertisement -

