Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपाऊस गेला लांबणीवर; उकाड्याने केले हैराण..!

पाऊस गेला लांबणीवर; उकाड्याने केले हैराण..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील जुलै महिन्यात थांबा देत बरसलेल्या मुसळधार पावसाने सर्वांना आनंदित करून सोडले होते.अश्यातच आता पावसाने दडी मारल्याने सर्वांनाच घामाघूम करून सोडले आहे. पाऊस बरसत नसल्याने उकाडा वाढला आहे.वाढलेल्या उकाड्यामुळे शेतातील बांध्यांतील पाणी सुकल्यामुळे रोवणीची कामेदेखील प्रभावित झाली आहेत.जुलै महिन्यात अधूनमधून बरसणाऱ्या संततधार पावसामुळे गारवा वाढून पारा घसरू लागला होता.त्यामुळे थंडावा जाणवत होता.मात्र,गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे.अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असून, दमदार पाऊस नसल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे.मात्र,पावसाने दडी मारताच उकाडा वाढला आहे.अचानक वातावरणात होत असलेल्या या बदलामुळे आरोग्यावर विपरित परिणाम जाणवत आहेत.विशेष म्हणजे, लहान मुले व वृद्धांना याचा अधिकच त्रास होत आहे.अनेक जिल्ह्यांत अल्प पावसामुळे पिके कोमेजण्याच्या मार्गावर असतांनाच आगामी दोन आठवडे पाऊस उसंत घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांवर संकट ओढावले आहे.आत दमदार पाऊस बरसला नाही,तर खरीप हंगामावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झालेला दिसून येतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!