उद्रेक न्युज वृत्त :-कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील ३६ वर्षीय महादेवी उर्फ माधुरी हत्तीण ग्रामस्थांच्या आणि तेथील मठाचा काळीज होती.हत्तीण नांदणी गावातच लहानाची मोठी झाली.अश्यातच,ज्या ठिकाणी ती लहानाची मोठी त्या ठिकाणाहून विविध कारणे पुढे करून तिला गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलविण्यात आले.त्यामुळे गावकऱ्यांनी विरोध दर्शवित पोलिसांवर दगडफेक,आंदोलने व तीव्र निषेध केला.त्यातच आता वनतारा प्राणी संवर्धन केंद्र हा मुकेश अंबानी ग्रुपचा असल्याने हत्तिणीला वनतारामध्ये हलवल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली,बेळगावसह कर्नाटकच्या सीमाभागात ‘जिओ’ सिम पोर्ट(नंबर तोच,मात्र कंपनी वेगळी) करण्याची लाट उसळली असून,यात २५ हजारांवर ग्राहकांनी कंपनीच्या सेवेला ‘जय हिंद जय भारत’ केले.विशेष म्हणजे,या बायकॉट मोहिमेत राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला.आमदार राहुल आवाडे यांनी स्वतःचा ‘जिओ’ सिमकार्ड नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करून घेतला.अश्यातच,सोशल मीडियावर जिओ सिम तोडण्याचे व पोर्ट करण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.त्यातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत चक्क रोवणी करणाऱ्या महिला मजुरांनिही घरच्यांच्या ‘जिओ’ सिमकार्डची सेवा बदलल्याचे दिसून येते.
‘गाव करी ते राव न करी’.. महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी चक्क सिम कार्डची सेवाच बदलली..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

