Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरसावधान..! तुमच्याही शहरात बनावट पनीर विक्री तर नाही ना.. - ४७२ किलो...

सावधान..! तुमच्याही शहरात बनावट पनीर विक्री तर नाही ना.. – ४७२ किलो ग्रॅम बनावट पनीर साठा जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-उन्हाळा कडकू लागला आहे.त्यामुळे बाजारात फळांच्या मागणीसह दुग्धजन्य पदार्थ व पनीर आदी पदार्थांची मागणी वाढली आहे.मागणी वाढताच भेसळीचे प्रमाण वाढत असते.त्यातच काही विक्रेत्यांना नागरिकांच्या आरोग्याशी कसलेही देणे- घेणे नसते.तुम्ही मरा किंवा जिवंत राहा,आमचा भला हिच आमची सेवा,अशी अनेकांची मनधारणा झाली आहे.अशातच चंद्रपूर शहरात बनावट पनीर विक्रीचा धक्कादायक प्रकार काल शुक्रवारी ७ मार्चला उघडकीस आला आहे.पनीरच्या नावाखाली चक्क चीज ॲनालॉग नावाच्या घातक पदार्थाची चंद्रपुरात विक्री केले जात असल्याचे धाडसत्रातून पुढे आल्याने पनीर शौकिनांनी तोंडावर हात ठेवले आहे.धाडसत्रात
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल १ लाख ५० हजार २०० रुपयांचा ४७२ किलो ग्रॅम पनीर साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी जी.टी.सातकर यांनी बुधवारी चंद्रपूर येथील सपना डेली निड्सची तपासणी केली.त्यावेळी दुकानात चीज ॲनालॉग हा अन्नपदार्थ पनीर म्हणून विक्री करीत असल्याचे समोर आले.पथकाने दुकानातून ५१ हजार २०० रुपये किमतीचा १९७ किलो ग्रॅम साठा जप्त केला.गोलबाजार परिसरातील तिलक मैदानात न्यू भाग्यश्री घी भंडारातून ९९ हजार रुपये किमतीचा पनीर म्हणून विक्री केला जाणारा २७५ कि.ग्रॅ.चीज ॲनालॉग हा घातक पदार्थ जप्त करण्यात आला.अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने चंद्रपुरातील विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.त्यामुळे बनावट पनीर विक्री तुमच्याही शहरात केली तर जात नाही ना..! अश्या चर्चांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उधाण येऊ लागले आहे.याकडे त्या-त्या जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!