Saturday, May 2, 2026
Homeनवी दिल्लीशेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान सन्मान निधी ६ हजारांवरून ८ हजार होण्याची...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीएम किसान सन्मान निधी ६ हजारांवरून ८ हजार होण्याची शक्यता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यांची रक्कम वाढवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही रक्कम ६ हजारांवरून ८ हजार रुपयांपर्यंत वाढवली जावू शकते. हप्त्यांची रक्कम वाढवण्यात आली, तर दर तीन महिन्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यात २ हजारांचा निधी प्राप्त होईल. सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना योजनेनुसार निधी वितरित केला जातो.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पैसे वाढवण्याव्यतिरिक्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्व पिकांसाठी किमान समर्थन मूल्यावर (एमएसपी) पॅनेल स्थापन करण्याची घोषणा करतील,अशीही शक्यता आहे. दरम्यान जानेवारी महिन्याच्या अखेरीस पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता येण्याची शक्यता आहे. या हप्त्याचे एकूण १३ कोटी शेतकरी कुटुंबे लाभार्थी असतील.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!