Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील नवीन शिधापत्रिकाधारक अन्न धान्यापासून वंचित.....- अनेक वर्षांपासून नवीन कार्डधारक अन्नधान्य मिळण्याच्या...

देसाईगंज तालुक्यातील नवीन शिधापत्रिकाधारक अन्न धान्यापासून वंचित…..- अनेक वर्षांपासून नवीन कार्डधारक अन्नधान्य मिळण्याच्या आशेवरच….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील नवीन शिधापत्रिकाधारक गेली दीड ते दोन वर्षांपासून रॉशन दुकानातील अन्नधान्य मिळण्याच्या लाभापासून वंचित असून अनेक शिधापत्रिकाधारक अन्नधान्य मिळण्याच्या आशेवरच असल्याने नवीन शिधापत्रिकाधारकातील कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घरकुलाचे लाभ मिळण्याकरिता व इतर कामाकरिता अनेक सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांनी देसाईगंज तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी वेगळ्या नवीन शिधापत्रिका काढून घेतल्या आहेत.नवीन शिधापत्रिका काढून काही शिधापत्रिकाधारकांना जवजवळ दीड ते दोन वर्ष लोटूनही रॉशन दुकानातील अन्नधान्याचा लाभ मिळत नसल्याने अजून किती दिवस अन्नधान्यासाठी वाट बघावी लागणार? असा प्रश्न अनेक नवीन शिधापत्रिकाधारकांना पडलेला आहे.काही शिधापत्रिकाधारकांना कार्डाचे आर.सी.क्रमांक मिळूनही लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.दगदगीच्या जीवनशैलीमध्ये दररोज मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे व पोटाची खळगी भरणारे अनेक कुटुंबे आहेत.

काही शिधापत्रिकाधारक भूमिहीन असून रोजगाराच्या संधी शोधून संसाराचा गाडा हाकण्याच्या तयारीत असून रोजगार मिळेनासा झाला आहे. अशातच अन्नधान्य मिळत नसेल तर काय करावे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.काही कुटुंबांना कार्डचे आर.सी.क्रमांकही मिळाले.मात्र कितीतरी वर्षांपासून रॉशन दुकानातून अन्नधान्य मिळत नसल्याने कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची पाळी येणार की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासन स्तरावरून अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ग्रामीण भागात ४५ हजाराच्या आत उत्पन्न असणारे लाभार्थी तर शहरी भागात १ लाख ५० हजाराच्या आत उत्पन्न असणारे लाभार्थी निवड करून प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ दिला जातो.मात्र दीड ते दोन वर्ष लोटूनही अन्नधान्याचा लाभ मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे?असा विचार सर्वसामान्यांच्या मनात घर करून सोडत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!