Monday, May 25, 2026
Homeआरमोरीमोठी बातमी; धान कापणी करणाऱ्या महिलेच्या नरडीचा वाघाने घेतला घोट….-आरमोरी तालुक्यातील आजची...

मोठी बातमी; धान कापणी करणाऱ्या महिलेच्या नरडीचा वाघाने घेतला घोट….-आरमोरी तालुक्यातील आजची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

आरमोरी(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात धान कापणीला सुरुवात झाली आहे.त्यानुसार शेतकरी बांधव शेतातील पाणी निचरा वा झालेले धान कापणी करीता महिला वर्गांना पाचारण करून शेतातील कामे पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत.अशातच देसाईगंज व आरमोरी तालुक्यात हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे.एक दिवसा आड वन्य प्राणी व मानवी संघर्ष होतांना दिसून येत आहेत.असाच प्रकार आज दिनांक – १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे.आरमोरी तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या रामाळा गावात; काळागोटा येथील सात ते आठ महिला आज शेतात धान कापणी करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे शेतात काम करीत असलेल्या महिलांवर हल्ला चढविला; सदर वाघाने चढविलेल्या हल्ल्यात आरमोरी तालुक्याच्या काळागोटा येथील महिला ताराबाई एकनाथ ढोडरे  अंदाजे वय ६० वर्षे यांना वाघाने काही अंतरावर दूर फरफटत नेऊन नरडीचा घोट घेतला; सहकारी महिलांनी आरडा-ओरड करून महिलेची सुटका तर केली; मात्र ताराबाई यांची प्राणज्योत मावळली.सदर घटनेची माहिती मिळताच आरमोरी वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम व विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!