Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाढा; ग्रामसेवक निलंबित..

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाढा; ग्रामसेवक निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-कामात हयगय करणे,पदाचा गैरवापर करणे, वित्तीय अनियमितता करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयात झोपी जाणे आदी तक्रारींचा पाढा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेला आणि चौकशी अंती आरोप सिद्ध होताच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी सावली तालुक्याच्या चकपिरंजी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दयानंद खोब्रागडे यांना निलंबित केले आहे.विशेष म्हणजे,प्रफुल्ल निरूडवार यांनी ग्रामसेवकाची तक्रार केली होती.निलंबन काळात खोब्रागडे यांना वरोरा पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.
ग्रामसेवक दयानंद खोब्रागडे यांच्या बाबतीत तक्रारींचा पाऊस पडला होता.त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तत्कालीन गट विकास अधिकारी व विद्यमान गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचबरोबर, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करणे,चौकशी सुरू असतांना सहकार्य न करणे व चौकशी अहवालात अनेक त्रुटी आढळून आल्या.प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी खोब्रागडे यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे.कारवाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!