Wednesday, June 10, 2026
Homeचंद्रपूरमित्र नदीत बुडाला तरीही राहिले गप्प; शोधाशोध करताच सापडला मृतदेह..!

मित्र नदीत बुडाला तरीही राहिले गप्प; शोधाशोध करताच सापडला मृतदेह..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शाळेला सुट्टी असल्याने तीन मित्र सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या नदीवर गेले.नदीवरील बंधाऱ्यातील दृश्य पाहून एकास आंघोळ करण्याची इच्छा झाल्याने त्याने उडी मारली.उडी मारताच खाली गेला,तो वर आलाच नाही आणि बुडून मृत्यू झाला. अश्यातच सहकारी दोन मित्र घाबरले.घटना घडून रात्र झाली तरीही गप्प राहिले.कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता सदर प्रकरण उजेडात आले.सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या चिमढा नदीत घडली.सोहम प्रमोद मोहुर्ले वय १५ वर्षे,रा.ता.सावली, जि.चंद्रपूर असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.सोहम हा सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयात इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता.
रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सोहम आणि त्याचे दोन मित्र सावली शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या चिमढा नदी किनारी फिरायला गेले.नदी किनारी पोहचताच आंघोळ करण्यासाठी सोहमने नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली.उडी मारली तेव्हा मित्र सोबत होते.सोहम पाण्याबाहेर न आल्याने दोघेही घाबरून घरी पोहचले.रात्र होऊनही आपला मुलगा घरी आला नसल्याने मोहुर्ले कुटुंबीयांनी परिसरात विचारपूस केली.काहींनी दुपारच्या सुमारास मित्रांबरोबर फिरायला गेला असल्याचे सांगितल्याने प्रकरणाची माहिती झाली.त्यानुसार कुटुंबीयांनी सावली पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत काल सोमवारी शोधाशोध केली असता सायंकाळी सहाच्या सुमारास सोहमचा मृतदेह सापडून आल्याने पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!