Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरमित्राला सोडून देण्यासाठी देसाईगंजला गेलेल्या ब्रम्हपुरीच्या तरुणाची वैनगंगा नदीत उडी...

मित्राला सोडून देण्यासाठी देसाईगंजला गेलेल्या ब्रम्हपुरीच्या तरुणाची वैनगंगा नदीत उडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरात वास्तव्यास असणारा २२ वर्षीय तरुण मित्राला सोडून देण्यासाठी दुचाकीने देसाईगंजला(वडसा)गेला.मात्र,परतीच्या वाटेवर असणाऱ्या देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली असल्याची घटना रविवारी २० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून काल,सोमवार २१ एप्रिलला तरुणाचे मृतदेह बाहेर काढण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे.कौशीक रंगराव खोब्रागडे,रा.ता. ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वडील रंगराव खोब्रागडे हे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,कौशीकने यापूर्वीही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.घटनेच्या दिवशी रविवारी तो सायंकाळच्या सुमारास ब्रम्हपुरीहून सायंकाळी पाचच्या दरम्यान,मित्राला सोडून देण्यासाठी देसाईगंजला गेला होता.मात्र,बराच उशीर होऊनही कौशिक घरी न आल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली व सोबत गेलेल्या मित्राला संपर्क साधून विचारणा केली असता,तो केव्हाचाच गेला असल्याची माहिती दिली.त्यानुसार कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता.अशातच काही नागरिकांनी हरदोली नदिघाटावरून कुणीतरी नदीत उडी घेतल्याची माहिती दिली.त्यानुसार याबाबत ब्रम्हपुरी पोलीस प्रशासनास माहिती देण्यात आली.काल सोमवारी पोलिसांनी नदी परिसरात शोधाशोध केली असता,मृतदेह सापडला.मृतदेह पाहून आईने एकच टाहो फोडला. कौशिकने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस प्रशासन करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!