Thursday, April 30, 2026
Homeनवी दिल्लीमहाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका २६ नोव्हेंबरपूर्वीच.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका २६ नोव्हेंबरपूर्वीच.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका विधानसभेची मुदत संपण्याआधीच होणार आहेत.२६ नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.ऑक्टोंबरमध्ये निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.याचे कारण म्हणजे,महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा कोणताही विचार सध्यातरी नाही.असे  केंद्रीय निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,महाराष्ट्र विधानसभेच्या विद्यमान सरकारचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे.त्याआधी महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत.वेळेत निवडणूका घेणे,ही घटनात्मक सक्ती असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत.वास्तविक २६ नोव्हेंबरपर्यंत निवडणुका न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल.निवडणूक आयोगाने अशी परिस्थिती निर्माण होऊ देण्यास स्पष्ट नकार दिला.निवडणूक आयोगाच्या नकारामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये पूर्ण होतील आणि नवे सरकारही निर्धारित वेळेत स्थापन होईल; असे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाने १६ ऑगस्ट रोजी,हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभांच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली होती.यावेळी आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली नाही. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबरला संपत आहे.महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे.अशा स्थितीत महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जम्मू- काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका सोबतच जाहीर होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र,निवडणूक आयोगाने तसे न करता केवळ हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकांची घोषणा केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!