- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ४० क्युमेक्स पाणी(४० हजार लिटर प्रति सेकंद)सोडण्यात आले असून धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार सदरचे विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी अधिक करण्यात येणार आहे.पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने नदीकाठावर किंवा नदीपात्रात ये-जा करणाऱ्या नागरिकांनी,मच्छिमारांनी तसेच पशुपालकांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नागरिकांनी नदी क्षेत्रापासून दूर राहावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.यासोबतच संबंधित यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपापल्या स्तरावर आवश्यक ती खबरदारी घ्यावी व सदरची माहिती तातडीने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी,असेही प्रशासनाने नमूद केले आहे.प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून,गरज भासल्यास पाणी विसर्जनाच्या प्रमाणात बदल केला जाईल.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व फक्त प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे,असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
- Advertisement -

