Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरपाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. - वाघाच्या अफवेने वनविभागासह...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून गावकऱ्यांनी वाघाने मारल्याची बोंब सुरू होताच अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूरपासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावरील भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील कोलारी परिसरात उघडकीस आली.माधव कानूजी रेवाडे वय ५२ वर्षे,रा.काकेपार, ता.पवनी,जि.भंडारा असे मृतकाचे नाव असून ते शेळ्या राखण्याचे काम करायचे.त्यातच,शनिवार २३ मे २०२६ रोजी त्यांनी घरच्यांना दवाखान्यात जाऊन येतो,असे म्हणून बेपत्ता झाले होते.कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी भंडारा जिल्ह्याच्या पवनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती.अश्यातच शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिस व वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!