Tuesday, May 26, 2026
Homeमुंबईधावत्या ट्रेनमधून तोल गेला; एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी...

धावत्या ट्रेनमधून तोल गेला; एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-शहराच्या लोकल ट्रेनने लटकून प्रवास करणे दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना उघडकीस आली आहे.काही महिन्यांपूर्वीच मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्टेशन दरम्यान लोकल ट्रेनला लटकून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता.सदरची घटना ताजी असतांनाच लोकल ट्रेनने लटकून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांचा तोल जाऊन खाली कोसळताच एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास वसई-नायगाव रेल्वे स्थानकाच्या मधोमध घडली.यात प्रतीश बाळाराम भोले याचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर नानासाहेब मदने,असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास विरार रेल्वे स्थानकातून सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी चर्चगेटकडे एक लोकल ट्रेन रवाना झाली.या लोकल ट्रेनमधून प्रतीश बाळाराम भोले आणि नानासाहेब मदने हे दोघेही दरवाज्यात उभे राहून प्रवास करत होते.दरवाज्यात उभे असतांनाच धावत्या गाडीतून दोघांचाही तोल गेल्याने खाली कोसळले.यात एकजण मृत पावला,तर एकजण गंभीर जखमी झाला.घटना घडताच रेल्वे स्थानकावरील नागरिकांनी धाव घेत गंभीर जखमी तरुणास तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल केले.अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. अपघात प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शाळा व सर्व शासकीय कार्यालयांच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा आज,मंगळवार २६ मे...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी.. – वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे...

​अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई.. -दोन वेगवेगळ्या छाप्यात ५ आरोपींवर गुन्हे दाखल; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नरेश मेश्राम व पोलीस कॉन्स्टेबल नितीन...

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!