Wednesday, June 10, 2026
Homeमुंबईदोन वेळच्या अन्नाची कशीतरी सोय करतात; तेही माणसच आहेत…मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय;...

दोन वेळच्या अन्नाची कशीतरी सोय करतात; तेही माणसच आहेत…मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; फुटपाथ वर राहणाऱ्या लोकांना दिलासा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -


उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आजही हजारो लोक रस्त्यांवर,फुटपाथ किंवा उघड्यावर राहत आहेत.दोन वेळच्या अन्नाची कशीतरी सोय करणाऱ्या या लोकांकडे घर भाड्यानेही घेण्याची परिस्थिती नाही.अशा हजारो लोकांचा विचार करणारा निर्णय मुंबई हायकोर्टाने आज ३ मार्च रोजी दिला.दक्षिण मुंबईतील फूटपाथवर राहणाऱ्या रहिवाशांना हटवण्याचे निर्देश देणारा कोणताही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.लोकांचे बेघर होणे ही जागतिक समस्या असून फूटपाथवर राहणारे लोकही इतर लोकांप्रमाणेच माणुस असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.शहरातील फूटपाथ आणि पदपथांवर अनधिकृत विक्रेते आणि फेरीवाले यांचा कब्जा असल्याच्या मुद्द्यावर हायकोर्टाने दाखल केलेल्या सुओ मोटू याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
न्यायमूर्ती पटेल म्हणाले, “ते (बेघर लोक) देखील माणसं आहेत. ते गरीब किंवा कमी भाग्यवान असू शकतात,परंतु ते देखील माणसे आहेत आणि ते न्यायालयाच्या दृष्टीने इतर माणसांप्रमाणेच मानव आहेत.” फूटपाथ आणि रुळांवर राहणाऱ्या अशा व्यक्तींसाठी रात्रीच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी सूचना असोसिएशनचे वकील मिलिंद साठे यांनी केली.हा एक उपाय आहे.ज्याचा अधिकारी विचार करू शकतात,असे खंडपीठाने म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!