Monday, May 25, 2026
Homeकुरखेडागोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने चढविला हल्ला- कुरखेडा तालुक्यातील आंधळी- नवरगाव येथील घटना

गोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने चढविला हल्ला- कुरखेडा तालुक्यातील आंधळी- नवरगाव येथील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :- तालुक्यातीलआंधळी-नवरगाव येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने हल्ला चढविल्याचे प्रत्यक्षदर्शी गावातील नागरिकांनी बघितले असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील खरमतटोला,अरततोंडी व आंधळी-नवरगाव गावा नजिक संपूर्ण आजूबाजूचा परिसर जंगल व्याप्त असल्याने वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.आंधळी-नवरगाव शेतकरी येथील प्रकाश कवाडकर हे नेहमीप्रमाणे पशुंना गोठ्यात बांधून रात्रीच्या सुमारास झोपी गेले होते.अशातच दरम्यान जंगलातून वाघाने थेट गावात प्रवेश करीत कवाडकर यांच्या गोठ्याच्या दिशेने मोर्चा वळविला. यावेळी वाघाने बांधलेल्या अवस्थेत असलेल्या गायीवर हल्ला चढविला.मात्र वाघापेक्षा मोठी असलेल्या गायीने प्रतिकार केला.दरम्यान घराशेजारच्या नागरिकांना याची चाहूल लागताच कवाडकर यांच्या गोठ्याकडे बघितले असताना वाघ व गायींमध्ये संघर्ष सुरू असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी व पशुपालक कवाडकर यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला.

गावातील नागरिकांच्या मते,काही दिवसांपासून वाघ गावामध्ये येत असल्याने जनावरांसह गावातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.त्याकरिता वन विभागाने वन्य जीव व मानवी संघर्ष टाळण्याकरिता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!