Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात विजेचा लपंडाव...- विद्युत पुरवठा विभाग गाढ झोपेत; उकाड्याने नागरिकांचे बेहाल....

देसाईगंज तालुक्यात विजेचा लपंडाव…- विद्युत पुरवठा विभाग गाढ झोपेत; उकाड्याने नागरिकांचे बेहाल….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली):- ऐन उन्हाळ्याच्या दिवसात देसाईगंज तालुक्यात दररोज कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्री-बेरात्री विजेचा लपंडाव सुरू आहे.अशातच उकाड्याने नागरिकांचे बेहाल होत असूनही देसाईगंज विद्युत पुरवठा विभाग एवढे गाढ झोपेत कसे?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

देसाईगंज तालुक्यात हल्ली वीज जाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून जणूकाही वीज समस्येची फॅशनच झाली असल्याचे दिसून येत आहे.जसे ‘फॅशन शो’ च्या वेळेस रॅम्प वॉक केले जाते; तशाच प्रकारचे वीज जाण्याचे ‘रॅम्प वॉक’ सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे.वादळ वारा काही वेळासाठी तर विजेचा लपंडाव कितीही काळासाठी असल्याने देसाईगंज विद्युत पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार दिसून येतोय.

वीज असो वा नसो विद्युत बिल सारखेच; अशातही विद्युत बिल भरणा करण्यास महावितरण कंपनी कडून तगादा लावला जातो.मात्र विजेच्या लपंडावाने नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे; त्याची भरपाई देणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहेत.विजेवर चालणारे पंखे,कुलर व इतर साहित्यही उकाड्यामुळे काम करीत नाही.अशातच वीजेची समस्येने आणखी त्यात भर पाडून नागरिकांचे घामामुळे ‘टीप-टीप बरसा पाणी’असे होत आहे.काही सुजाण नागरिकांच्या मते,जाणून बुजून वीज वाचविण्याकरिता विजेचा लपंडाव तर सुरू नसावा ना..!अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.काही काळ जरी वीज बंद ठेवली गेली तरी भरपूर व मोठ्या प्रमाणावर वीजेची बचत होऊन विद्युत वितरण कंपनीस त्याचा लाभ होत असतो.लाभासाठी हल्ली कुणी कुठलेही पाऊल उचलू शकतात; असे म्हणणे चुकीचे ठरुच शकणार नाही.  

दररोज दिवसाढवळ्या,रात्री-बेरात्री जाणाऱ्या विजेमुळे नागरिकांचे बेहाल होत असल्याने ‘ये ना चॉलबे’ यासाठी देसाईगंज विद्युत पुरवठा विभागाने याकडे कानाडोळा न करता विजेच्या समस्येवर उपाययोजना करून त्यावर त्वरित तोडगा काढण्यात यावा;अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!