Thursday, April 16, 2026
Homeनांदेडचार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नांदेड शहराच्या हारूनबाग परिसरात घडली.घटनेने नांदेड शहरात शोककळा पसरली असून मृतक चिमुकल्यांच्या कुटुंबीयांनी काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश केला.मोहम्मद अली वय १३ वर्षे, सय्यद फूरखान वय १३ वर्षे,मोहम्मद अदनान वय १० वर्षे आणि मोहम्मद रेहान वय ११ वर्षे,अशी मृत मुलांची नावे असून चौघेही नांदेड शहराच्या इस्लामपूरा भागातील आहेत.यातील फूरखान आणि रेहान हे दोघे सख्खे भाऊ होते.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. जवळच काठावर मुलांचे शालेय गणवेश,जुते आणि चपला आढळून आल्या,तेव्हा या दुर्घटनेची भीषणता समोर आली.घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे,इतवारा पोलीस ठाण्याचे  अधिकारी व जीवरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले.चौघांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.हारुनबाग परिसरात नाल्याचे काम सुरू आहे.तिथे मोठ-मोठे खड्डे पडून पाणी साचले असल्याने उन्हाचा तडाखा किंवा खेळण्याच्या ओघात शाळकरी मुले आंघोळ वा पोहण्याच्या उद्देशाने त्या पाण्यात उतरली असावी.मात्र,खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाणी अतिशय खोल असल्याने चारही मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!