- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व दादा पाटील महाविद्यालय कर्जत,जि.अहिल्यानगर यांचे वतीने दरवर्षी साहित्यिकांकरीता राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.राज्य स्तरावर अत्यंत दर्जेदार व प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी १६३ साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात १६ साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून मराठी नाट्यवाड्.मय प्रकारात प्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित धरती आबा : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा’ या महानाट्यास यंदाचा नाट्यलेखनाचा सत्यशोधक अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार-२०२६ प्रदान करण्यात आला.
‘सैराट’ या प्रसिद्ध चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिद्ध साहित्यिक ‘दंगल’कार नितीन चंदनशिवे, सौ.शर्मिला गोसावी,सत्यवान मंडलिक,प्रा.नवनाथ केंदळे,प्रा.तानाजी डाडळ, देविदास राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चुडाराम बल्हारपुरे यांना या वर्षी मराठवाड्यात मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे,तर राज्यस्तरावर मिळालेला हा आठवा पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल झाडीपट्टीत सर्वत्र कौतुक होत असून प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे, रमेश निखारे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू-मेश्राम, नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर, डॉ.दिपक चौधरी,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर(प्रकाशक)इतर साहित्यिक तथा कलावंतांनी शुभेच्छांचा वर्षाव करत अभिनंदन केले आहे.
- Advertisement -

