- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान मसाला जाहिरातींबाबत बॉलिवूडच्या बड्या कलाकारांकडे ‘विमल’ करारांची मागणी करण्यात आली आहे.त्यानुसार,बॉलिवूडचे कलाकार अजय देवगण,शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांसारख्या बड्या अभिनेत्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे.विशेष म्हणजे, तिघांनाही स्पष्टीकरण देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.त्याचबरोबर,विहित मुदतीत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; अन्यथा कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.त्यांच्याकडून प्रचार करार,मोहिमेचा तपशील, मानधनाचे तपशील आणि योग्य ती खबरदारी घेतल्याच्या पुराव्यांच्या संपूर्ण प्रतींची मागणी केली आहे. आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई कां केली जाऊ नये? याचे लेखी स्पष्टीकरण पंधरा दिवसांच्या आत सादर करण्याचा अंतिम इशारा या कलाकारांना देण्यात आला आहे.संबंधित ग्राहक संरक्षण कायद्यांनुसार,दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी १० लाख रुपये ते ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि संबंधित कलाकारांवर तीन वर्षांपर्यंत कोणत्याही उत्पादनाच्या जाहिराती करण्यास बंदी घातली जाऊ शकते.तिन्ही अभिनेत्यांवर आरोप आहे की,त्यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ ब्रँडचे नाव वापरून इलायचीच्या नावाखाली अप्रत्यक्ष जाहिरात केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.या कलाकारांना संबंधित मोहिमेतील सहभाग त्वरित थांबवण्याचे आणि जाहिरातीशी संबंधित सर्व प्रचार,साहित्य त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स व वेबसाइट्सवरून काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.यावर अद्याप बॉलिवूड कलाकारांनी चुप्पी साधली असल्याने येत्या काळातील कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
- Advertisement -

