Sunday, August 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. - गरज...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून(आयएमडी)देण्यात आला आहे.महाराष्ट्रात पुढील काही दिवस अतिउष्णतेचा इशारा देण्यात आल्याने गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार,कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवसांत तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.तर विदर्भासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असून तिथे तापमानाचा पारा तीन अंशांनी चढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर,मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिल, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल,तर कोकणात १५ ते १७ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे,हलके व सैल कपडे वापरावेत तसेच बाहेर जातांना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.सावलीत विश्रांती घेणे व घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.जेष्ठ नागरिक व मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच दुपारी बारा ते चार या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान व कॅफिनयुक्त पेये टाळावीत आणि उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे.महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४० अंशावर-पुणे-४१.८, जळगाव-४२.८,सांगली-४१.८,सातारा-४०.९,सोलापूर- ४३.९,मालेगाव-४३.२ तर विदर्भातील जिल्ह्याचा पारा ४२ च्या पुढे-अकोला-४४.२,अमरावती-४४,बुलढाणा- ४२.४,चंद्रपूर-४२.६,गोंदिया-४२,नागपूर-४३.४,वाशीम- ४२.६,वर्धा- ४३.९,यवतमाळ-४२.८ तर मराठवाड्यातील धाराशिव-४१,छत्रपती संभाजीनगर-४१,परभणी-४२ आणि बीड -४३.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!