Monday, December 15, 2025
Homeदेसाईगंजदेसाईगंज उमेद अभियान व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सखी यांचे...

देसाईगंज उमेद अभियान व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सखी यांचे एकदिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज :- तालुक्यातील शंकरपूर येथे कृषी तंत्रनिकेतन याठिकाणी २८ कृषी सखी यांची आज २६ मे रोजी एकदिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी देसाईगंजचे निलेश गेडाम व विजय बर्डे उमेद यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली.सदर प्रशिक्षण व कार्यशाळेत माती परीक्षण,पेरणीपूर्व मशागत,एकत्रित बी-बियाणे खरेदी,बिज-निवड,बिज प्रक्रिया,गादीवाफा तयार करणे,श्री पद्धती व सेंद्रिय औषधी तयार करणे व वापर करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक देशमुख,रहांगडाले (बीटीएमआत्मा), मंगेश वॉलदे (उमेद) यांनी केले. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक कोहडे  यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी व्यवस्थापक उमेदच्या अश्विनी मेश्राम यांनीकेले.सदर प्रशिक्षण व कार्यशाळे प्रसंगी कृषी सहाय्यक कल्पना ठाकरे, दमकुंडवार,औरासे, उमेदचे कृषी व्यवस्थापक प्रशांत मंडपे व तालुक्यातील बहुसंख्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!