Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरदहा दिवसांपासून सरपंच अद्यापही फरारच…-वीज कर्मचाऱ्याला वीजखांबाला बांधण्याचे प्रकरण…

दहा दिवसांपासून सरपंच अद्यापही फरारच…-वीज कर्मचाऱ्याला वीजखांबाला बांधण्याचे प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- महावितरण घुग्घुस कार्यालयांतर्गत नकोडा येथील वीज कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना वीजखांबाला दुपट्टयाने बांधून शिवीगाळ करणारे नकोडाचे सरपंच किरण बांदुरकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.मात्र,१० दिवसांपासून फरार असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.आरोपी सरपंच भाजपचे समर्थक आहेत; हे विशेष.

१५ जून २०२४ रोजी वीज कर्मचारी सूरज परचाके हे कर्तव्यावरून उसगावकडे येत होते.दरम्यान,नकोडाचे सरपंच किरण बांदुरकर व अन्य दोन इसमांनी अडवून परचाके यांना नकोडा गावात आणले.त्यांच्याच दुपट्टयाने वीजखांबाला बांधून शिवीगाळ केली.वीज कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सरपंच बांदुरकरविरुद्ध गुन्हा दाखल केला.मात्र,अटकेपूर्वीच फरार झाले.फरार सरपंचाला अटक करण्याच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

दरम्यान,कर्मचाऱ्यांनी आरोपीला अटक केल्याशिवाय कर्तव्यावर रूजू होणार नाही; असा इशारा दिला होता. हे आंदोलन आणखी काही दिवस सुरूच राहील अशी स्थिती निर्माण झाली होती.पोलिस अधीक्षकांनी सरपंचाला अटक करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. मात्र, घटनेला १० दिवस होऊनही पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!