Wednesday, August 5, 2026
Homeभंडाराटिप्परचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुण जागीच गतप्राण..

टिप्परचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुण जागीच गतप्राण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-खापा रामटेक राष्ट्रीय महामार्गावर ट्रक- दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार झाल्याची घटना काल,गुरुवारी २० मार्चच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील
काटेबाम्हणी येथील बस स्थानकासमोर घडली. टिप्परचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुण जागीच गतप्राण झाला.मृताचे नाव सचिन मधुकर बालपांडे वय ३७, रा.दाभा-कोथूर्णा भंडारा असे आहे. अपघातात टिप्पर दुचाकीवरून गेल्याने गाडीसह युवकाचाही अक्षरशः चेंदामेंदा झाला.अपघात घडताच अज्ञात टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिकांनी वाहनाचा पाठलाग केला मात्र तो गवसला नाही.मिळालेल्या माहितीनुसार मृतक सचिन रामटेक मार्गे खापा करीता आपल्याच बाजूने दुचाकी क्रमांक- एम एच- ३६ आर-८३५८ ने निघाला होता.दरम्यान विरुद्ध दिशेने रामटेक धावणाऱ्या टिप्परने त्याला गाव शिवारातील हलक्या वळण मार्गावर धडक दिली. गावच्या मुख्य चौकात उपस्थितांनी घटना आपल्या डोळ्यांनी बघितली.अशातच अज्ञात टिप्पर नागरिकांनी पाठलाग केला असता पाठलाग करणाऱ्यांना टिप्पर गवसले नाही.मात्र घटनेची माहिती पोलिसांना देऊनही तब्बल ४० मिनिटे लोटूनही यंत्रणेने घटनास्थळ गाठले नसल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!