Monday, December 15, 2025
Homeआरमोरीघराबाहेर पडली 'ती' परतलीच नाही; अल्पवयीन मुलीचा थांगपत्ताच लागेना..!

घराबाहेर पडली ‘ती’ परतलीच नाही; अल्पवयीन मुलीचा थांगपत्ताच लागेना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-नेहमी कॉलेजला जाणारी अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली ती घरी परतलीच नाही.कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध करुनही तिचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने अखेर मुलीच्या वडिलांनी आरमोरीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सदर प्रकरण उजेडात आले.आरमोरी तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलगी ११ वीत शिक्षण घेत आहे.ती दररोज कॉलेजला जात होती.मात्र,चार दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवार ११ ऑगस्ट रोजी नेहमी प्रमाणे ती कॉलेजला जाते म्हणून सकाळच्या सुमारास घराबाहेर पडली.कॉलेजची सुट्टी दुपार पर्यंत होत असल्याने ती दुपारी घरीच गेली नाही.त्यामुळे कुटूंबीय चिंताग्रस्त झाले.मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या पालकांनी कॉलेजला जाऊन विचारपूस केली असता,ती कॉलेजात गेली नसल्याची माहिती मिळाली. नातलग,मित्र-मैत्रीण व इतर ठिकाणी शोध घेऊनही ती कुठेच आढळून आली नसल्याने १७ वर्षीय मुलगी कुठे गेली असावी? कुणी फुस लावून पळवून तर नेले नसावे? या विवंचनेत असतांनाच मुलीच्या कुटुंबीयांनी आरमोरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.त्यानुसार अज्ञाता विरुद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष काडोळे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!