Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील उर्वरित पुरबाधित शेतकऱ्यांनी तात्काळ मोबाईल क्रमांक द्यावे... -अन्यथा नुकसानभरपाईच्या रकमेपासून...

कोंढाळा येथील उर्वरित पुरबाधित शेतकऱ्यांनी तात्काळ मोबाईल क्रमांक द्यावे… -अन्यथा नुकसानभरपाईच्या रकमेपासून राहणार वंचित.. – देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांचे आवाहन..

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात मागील वर्षाच्या २०२३ मधील ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील कोंढाळा,कुरुड, आमगाव व सावंगी गावातील शेतकरी बांधवांच्या उभ्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांना नुकसानभरपाईची रक्कम मिळावी; याकरीता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचेसह भाजपाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार पुरबाधित शेतकऱ्यांना शासन स्तरावरून नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.अशातच आता शासन स्तरावरून पूरग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याकरिता मोबाईल क्रमांक अनिवार्य केले असल्याने कुरुड,आमगाव व सावंगी गावातील शेतकऱ्यांनी गावातील तलाठी तसेच ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईल क्रमांक दिल्याने सदर शेतकऱ्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र,कोंढाळा गावातील पूरबाधित नुकसानग्रस्त ४५० शेतकऱ्यांपैकी ५८ शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत तलाठी वा ग्रामपंचायत कार्यालयात मोबाईल क्रमांक दिले नसल्याने कोंढाळा गावातील शेतकऱ्यांना अजून पावेतो नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली नाही.त्यानुसार आता उर्वरित ५८ शेतकरी मागील वर्षाच्या नुकसानभरपाईच्या रकमेपासून वंचित राहू शकतात.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत मोबाईल क्रमांक दिला नसेल,अशा शेतकऱ्यांनी लवकरात-लवकर मोबाईल क्रमांक देण्याचे करावे; असे आवाहन देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी केले आहे.
सुनील पारधी,देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष👇
वर्ष २०२३ मधील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पूरग्रस्त शेतीच्या नुकसानीची रक्कम शासनाकडून केव्हाचीच प्राप्त झाली आहे.त्याचबरोबर वर्ष २०२४ म्हणजेच चालू वर्षातील जुलै तसेच सप्टेंबर महिन्यातीलही पूरग्रस्त शेतीच्या नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली असून शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!