Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथील इसमाचा गावातील बैठकीवरच झाला मृत्यू....-आज दुपारची घटना….

कोंढाळा येथील इसमाचा गावातील बैठकीवरच झाला मृत्यू….-आज दुपारची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- तालुक्यातील कोंढाळा येथील इसमाचा गावामध्ये ठेवण्यात आलेल्या बैठकीवरच विसावा घेतांना मृत्यू झाल्याची घटना आज १७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली असल्याने गावात हळहळ व्यक्त केले जात आहे. 

प्राप्त माहितीनुसार,कोंढाळा येथील खटू ऊर्फ प्रभाकर रामा बुराडे वय अंदाजे ५२ वर्षे हे काही काम करून घरी परत जात असतांना, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने वार्ड क्रमांक ४ येथील राजू शिवणकर यांच्या घरासमोरील परिसरात ठेवण्यात आलेल्या बैठकीवर विसावा घेतला; विसावा घेत असतांना घरा नजिकचे काही नागरिक त्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न करीत असतांना बुराडे यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याने गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली.माहिती देताच पोलीस पाटील यांनी घटनास्थळ गाठून शहानिशा केली असता,प्रभाकर बुराडे यांची प्राणज्योत मावळली असल्याचे दिसून आले.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्यातील कोंढाळा बिट अंमलदार मदन मडावी तसेच जांभूळकर यांना देताच घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण माहिती व शहानिशा करून ठाणेदार किरण रासकर यांना कळविण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!