- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने रेतीघाट लिलाव केलेय खरी,पण अवैधरित्या वाळूची चोरी करणाऱ्या चोरट्यांपेक्षा काही रेतीघाटधारकच महाचोरटे असल्याचा प्रकार आज,शुक्रवार २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड गावच्या बोडेगाव रेतीघाटात उघडकीस आल्याने अवैध उत्खनन जोमात,तर देसाईगंज महसूल विभाग कोमात गेल्याचे चित्र दिसून येत आहे.ना भुरी मांजर लक्ष घालतेय,ना कालू भाऊ भटकून पाहतो. आश्चर्याची बाब म्हणजे,वाळू उत्खननाची वेळ संपूनही रेतीघाटात आठ ते दहा ट्रॅक्टर अवैधरीत्या रेती उत्खनन करून त्याची वाहतूक साठवणूक केलेल्या ठिकाणी करीत होते.त्यामुळे,ग्रामीण भागात अवैध रेतीचा उपसा तसेच अवैधरीत्या रेतीची चोरी करणाऱ्या चोरट्यांवर अंकुश घालण्यासाठी महसूल विभागाचे पथक खरोखरच जिवंत आहेत काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोडेगाव रेती घाटात अवैध उत्खनन जोमात तर आहेच, याशिवाय रेती घाटाजवळ लागूनच एका शेतालगतच्या आडोशात जेसीबी ठेवलेली आढळून आल्याने रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.कारण की,ना भुरी मांजर लक्ष घालतेय,ना कालू भाऊ भटकून पाहतो. एवढा सारा प्रकार घडत असतांनाही “ना हाक ना बोंब” म्हणजेच “आम्ही खुश तर तुम्ही खुश” अशीच करून कहाणी समजावी लागेल.नागरिकांच्या तक्रारीनुसार गडचिरोली जिल्हाधिकारी रेती घाटांची चौकशी लावतात. पण इकडे सर्व मिलीभगत असल्याने अवैध उपशावर पांघरून घातले जातेय,हे रेती घाटातील सारवा-सारव केलेल्या प्रकारावरून स्पष्टपणे निदर्शनास येते.अवैध उत्खनन सुरू असल्याबाबत कुरुड येथील अतिरिक्त पदभार असलेले पी.एस.कुमरे यांना माहिती दिली असता,मी आता जाऊन येतो आणि बघतो,असे सायंकाळचे साडेसात वाजे सांगितले.आता ते खरोखरच रेती घाटावर गेले की काय?अन् सुरू असलेला अवैध उत्खनन बंद केला की काय? नाहीतर आज जातील अन् उद्या पूर्ववत सुरू,म्हणजेच ‘जशीची लंका तशीच’ असे व्हायला नको.नाहीतर याविरोधात आवाज बुलंद करण्याचा इशारा सुजाण नागरिकांनी दिला आहे.

- Advertisement -

