- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी घेतल्याची घटना शनिवार १३ डिसेंबरला दुपारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही शेत शिवारात घडली.वाघाने ४७ वर्षीय शेतकरी महिलेचा जीव घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.छाया अरुण राऊत ४७ वर्षे,रा.गुंजेवाही, ता.सिंदेवाही असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी महिलेचे नाव असून त्या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या.सकाळपासून शेतावर गेलेल्या छाया ह्या सायंकाळ होऊनही घरी परतल्या नसल्याने कुटूंबीय तसेच गावातील नागरिकांनी शेत शिवारात शोध घेतला.पाहतात तो काय छाया यांचा मृतदेह
शेताजवळच रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती सिंदेवाही वनविभाग तसेच पोलिसांना देण्यात आली.वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.घटनेने परिसरात दहशत पसरली असून गावकऱ्यांनी वनविभागाप्रति तीव्र संताप व्यक्त करून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
- Advertisement -

