Sunday, September 6, 2026
Homeनागपूरकमी किंमतीत कार आणि दुचाकी मिळवून देण्याचे आमिष; पंधराहून अधिक ग्राहकांना चुना..!

कमी किंमतीत कार आणि दुचाकी मिळवून देण्याचे आमिष; पंधराहून अधिक ग्राहकांना चुना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- एका टोळीने कमी किंमतीत कार आणि बाइक मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल पंधराहून अधिक ग्राहकांना चुना २९ लाख ८८ हजार रुपयांना चुना लावल्याची घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.प्रकरणी आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून मो.सर्फराज व मो.शकील याला अटक करण्यात आली आहे.२९ वर्षीय रजा रियाजखान पठाण रा.लाकडीपूल,कोतवाली असे तक्रारदाराचे नाव असून त्याची नातेवाइकांच्या माध्यमातून गंगाबाई घाट मार्गावरील एमएच मोटर्सचा मालक फिरोज हमीद खान पठाण वय ३० वर्षे, सुभाननगर याच्यासोबत भेट झाली.फिरोजने हसनबाग येथील ३५ वर्षीय वहीद आलम,तसेच शहीदनगर,रनाळा, कामठी येथील २५ वर्षीय मो.सर्फराज मो.शकील व जय कुखे वय ३३ वर्षे,कॉटन मार्केट यांच्यासोबत मिळून १० एप्रिल २०२३ ते १० ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत आरोपींनी रजाकडून साडेसात लाख रुपये उकळले; मात्र कुठलीही गाडी दिली नाही.त्याचबरोबर,रजाने चौकशी केली असता आरोपींनी अशाच प्रकारे १५ हून अधिक जणांकडून २९ लाख ८८ हजार रुपये घेतले होते.त्यांनी वाहनांची खोटी कागदपत्रे बनविली व बँकेत कमी डाऊन पेमेंट भरून ग्राहकांकडून जास्त रक्कम घेतली.सदरचा प्रकार समोर येताच रजाने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणी लकडगंज पोलिसांनी दोघांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!