- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-राज्यासह विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नदी,नाले ओसंडून वाहू लागलेत.काही जिल्ह्यात ढगफुटी होऊन जनजीवन विस्कळित झाले आहे.अश्यातच हवामान खात्याने आणखी पुढील पाच ते सहा दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुख्यत्वे,रोवणी होऊन बरेच दिवस झाले.पण, पावसाअभावी जमिनीला भेगा पडल्याने धानपिक करपण्याच्या मार्गावर असतांनाच पाऊस सुरू झाला.परंतु,अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने पडणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंदाश्रू सोडत असला तरीही आणखी पाऊस पडला जावा,अशी अपेक्षा अनेक शेतकरी बांधव बाळगतांना दिसून येतात.त्यातच गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरणात जोरदार पाऊस पडल्याने काल शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धरण शंभर टक्के भरले असून,ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठावरील गावांनी तसेच नदीपात्रातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.विशेष करून पर्यटकांनी काळजी घ्यावी,जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये.
- Advertisement -

