Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियाइटियाडोह धरणाच्या पाणी पातळीत वाढ; सतर्कतेचा इशारा..!

इटियाडोह धरणाच्या पाणी पातळीत वाढ; सतर्कतेचा इशारा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-राज्यासह विदर्भात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने नदी,नाले ओसंडून वाहू लागलेत.काही जिल्ह्यात ढगफुटी होऊन जनजीवन विस्कळित झाले आहे.अश्यातच हवामान खात्याने आणखी पुढील पाच ते सहा दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुख्यत्वे,रोवणी होऊन बरेच दिवस झाले.पण, पावसाअभावी जमिनीला भेगा पडल्याने धानपिक करपण्याच्या मार्गावर असतांनाच पाऊस सुरू झाला.परंतु,अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने  पडणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंदाश्रू सोडत असला तरीही आणखी पाऊस पडला जावा,अशी अपेक्षा अनेक शेतकरी बांधव बाळगतांना दिसून येतात.त्यातच गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरणात जोरदार पाऊस पडल्याने काल शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धरण शंभर टक्के भरले असून,ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठावरील गावांनी तसेच नदीपात्रातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.विशेष करून पर्यटकांनी काळजी घ्यावी,जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!