- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-गावालगत असलेल्या जंगल परिसरातील
हिंस्त्र प्राणी थेट गावात येऊन घरात प्रवेश करू लागल्याने संपूर्ण गावकरी भेदरून गेल्याची घटना आज,मंगळवार १८ नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथे सकाळी पाचच्या सुमारास घडली.जंगल परिसरातून ठुमकत-ठुमकत निघालेल्या एका अस्वलाने गावात एंट्री केली. गावात एंट्री करताच काही नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात करताच घाबरलेल्या अस्वलाने थेट घरात प्रवेश करून तिथेच बस्तान मांडल्याने गावात एकच खळबळ माजली.प्रकरणी वन विभागाचे पथक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून अस्वलीला पिंजऱ्यात पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.
माहितीनुसार,आज सकाळच्या सुमारास डोंगरगाव येथील काही नागरिक घराशेजारी शेकोटी शेकत असतांना त्यांना गावात अस्वल आल्याचे दिसले. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली.ओरड सुरू असतांनाच अस्वलीने थेट ६० वर्षीय शेतकरी सुंदर जुमनाके यांच्या घरात प्रवेश करून तिथेच बस्तान मांडला.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली आणि सदरची माहिती वन विभागासह पोलीस प्रशासनास दिली.वन विभागाची चमू व पोलिसांनी घटनास्थळ गाठत नागरिकांना सतर्क केल्याने मोठी जीवितहानी टळली. डोंगरगाव हा घनदाट जंगल परिसराला लागून असल्याने गावकऱ्यांना नेहमीच हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन तर होतेच,मात्र आता वन्यप्राणी चक्क गावात येऊ लागल्याने गावकरी धास्तावले आहेत.
- Advertisement -

