Monday, December 15, 2025
Homeचंद्रपूरअवैध वृक्ष तोडीचे प्रकरण वनरक्षकला भोवले; अखेर निलंबित- नाला खोलीकरणाच्या नावाखाली केली...

अवैध वृक्ष तोडीचे प्रकरण वनरक्षकला भोवले; अखेर निलंबित- नाला खोलीकरणाच्या नावाखाली केली होती वृक्ष तोड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- चिमुर तालुक्यातील भिसी उपक्षेत्रातील नाला खोलीकरणाच्या नावाखाली वनरक्षक अमोल झलके यांनी महालगाव काळू वनविकास महामंडळातील जंगलात झाडाची कत्तल केली.हिरव्यागार जंगलाला भकास केले.वन संवर्धनाचा वसा घेतलेल्या वनविभागाकडून हे कृत्य झाल्याने पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी आक्षेप घेतला होता.

त्यानंतर वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले होते.वनरक्षकाला वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न झाला.मात्र माध्यमांनी हे प्रकरण लाऊन धरल्यानंतर वनविभागाला उशिरा का होईना कारवाई करावी लागली आहे.अखेर वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी’ त्या’ वनरक्षकाला दोषी धरुन चौकशी अंती निलंबित केले आहे. त्याचे नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयात स्थानांतरण करण्यात आले आहे. वनरक्षकाला निलंबित करण्यात आल्यामुळे वन विभागांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!