Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरअवैध वृक्ष तोडीचे प्रकरण वनरक्षकला भोवले; अखेर निलंबित- नाला खोलीकरणाच्या नावाखाली केली...

अवैध वृक्ष तोडीचे प्रकरण वनरक्षकला भोवले; अखेर निलंबित- नाला खोलीकरणाच्या नावाखाली केली होती वृक्ष तोड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- चिमुर तालुक्यातील भिसी उपक्षेत्रातील नाला खोलीकरणाच्या नावाखाली वनरक्षक अमोल झलके यांनी महालगाव काळू वनविकास महामंडळातील जंगलात झाडाची कत्तल केली.हिरव्यागार जंगलाला भकास केले.वन संवर्धनाचा वसा घेतलेल्या वनविभागाकडून हे कृत्य झाल्याने पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी आक्षेप घेतला होता.

त्यानंतर वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले होते.वनरक्षकाला वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न झाला.मात्र माध्यमांनी हे प्रकरण लाऊन धरल्यानंतर वनविभागाला उशिरा का होईना कारवाई करावी लागली आहे.अखेर वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी’ त्या’ वनरक्षकाला दोषी धरुन चौकशी अंती निलंबित केले आहे. त्याचे नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयात स्थानांतरण करण्यात आले आहे. वनरक्षकाला निलंबित करण्यात आल्यामुळे वन विभागांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!