Monday, May 25, 2026
Homeबीडकर्ज मागणीच्या तगाद्याला कंटाळून; मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

कर्ज मागणीच्या तगाद्याला कंटाळून; मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बीड : कर्ज मागणीच्या हप्त्याच्या तगाद्याला कंटाळून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही धक्कादायक घटना बीडच्या धारूर तालुक्यातील आसरडोह शिवारात घडली आहे.नितीन लक्ष्मण पाटोळे वय ३४असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

मुख्याध्यापक नितीन पाटोळे यांनी बीडच्या माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेटच्या दिंद्रूड शाखेकडून २०१९ मध्‍ये वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरूवातीला १० हजार रुपये हप्त्याने कर्जाची परतफेड केली. मात्र कोरोना काळात काही हप्ते थकले.त्यानंतर जून २०२२ रोजीपासून १५ हजार रुपये हप्ता ते भरत होते.तरी देखील मंगलनाथ मल्टीस्टेटचे वसूली पथकातील अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी तगादा लावला होता.त्यांना सातत्याने त्रास देऊन कारवाईची धमकी देत होते.यामुळे पाटोळे व्यथित होते.यातूनच कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

नितीन पाटोळे यांच्या पश्चात आई- वडील,पत्नी,दोन मुली असा आप्त परिवार असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!